नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्जमाफी समितीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत शेतकरी नेते सन्माननीय बच्चू कडू यांनी एक मोठी आणि दिलासादायक मागणी लावून धरली. ती म्हणजे, कर्जमाफी करताना केवळ थकीत (Defaulter) शेतकऱ्यांचाच नव्हे, तर नियमित कर्ज भरणाऱ्या (Regular Loan Payers) शेतकऱ्यांचाही विचार करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा.
नियमित कर्जदारांची भावना समाविष्ट
माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, राज्यातील नियमित कर्ज भरणारे शेतकरी वारंवार अशी भावना व्यक्त करत आहेत की, ‘आम्ही वेळेवर कर्ज भरतो म्हणून काय पाप केले?’ त्यामुळे नियमित कर्जदारांना वगळणे अन्यायकारक ठरू शकते. म्हणूनच, थकीत शेतकऱ्यांबरोबरच नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील कर्जमाफीच्या कक्षेत गृहीत धरले जावेत आणि त्यांचीही कर्जमाफी करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी समितीसमोर मांडली. राज्य सरकारने जर ठरवले, तर ते आरबीआयच्या नियमांना बाजूला ठेवून रेगुलर कर्जदारांची सुद्धा कर्जमाफी करू शकते, यावर त्यांनी भर दिला.








